डॉ बाबासाहेब आंबेडकर | Dr B R Ambedkar

dr b r ambedkar
dr b r ambedkar

भारताच्या इतिहासामध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर | Dr B R Ambedkar यांच्या महान कार्याला तोड नाही. आपले संपूर्ण जीवन बाबासाहेबांनी दलित व अन्यायग्रस्त समाजासाठी खर्ची घातले. डॉ बाबासाहेब थोर राजनीतिज्ञ, समाजसुधारक आणि अर्थतज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतो अशा या महान आणि असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या महापुरुषाविषयी माहिती आपण आज जाणून घेऊयात.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म :

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr B R Ambedkar) जन्म मध्यप्रदेश मधील इंदौर शहरावळील “महु” या गावी १४ एप्रील १८९१ रोजी झाला.
  • बाबासाहेबांचे पुर्ण नाव :
  • भीमराव रामजी सपकाळ-आंबेडकर असे होते. बाबासाहेबांचे वडीलांचे पुर्ण नाव रामजी माजोजी सपकाळ व आईचे नाव “भीमाबाई” असे होते. बाबासाहेबांचे वडील हे ब्रिटीश सैन्यामध्ये सैन्यामध्ये “सुभेदार” पदावर कार्यरत होते. बाबासाहेब हे त्यांच्या आई वडीलांचे १४ वे आपत्य होते.
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील “आंबावडे” हे होते.
  • डॉ बाबासाहेब आंबेडकारांचे अत्यंत आवडते शिक्षक आंबेवडेकर यांच्या नावावरुन आंबेडकरांचे आडनाव “सपकाळ” असे बदलून त्यांनी “आंबेडकर’ हे नवीन आडनाव लावायला सुरुवात केली. आपल्या प्रेमळ गुरु बद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आपल्या गुरुचे आंबेडकर हे नाव आंबेडकांनी स्विकारले होते.
  • विवाह :
  • १९०८ मध्ये बाबासाहेबांचा विवाह दापोलीच्या भिकू वलंगकरांच्या रमु उर्फ “रमाबाई” यांच्याशी झाला. परंतु १९३५ मध्ये रमाबाई यांचे निधन झाले. पुढे १९४८ मध्ये डॉ सविता कबीर या ब्राह्मण महीलेशी आंबेडकरांनी दिल्ली येथे दुसरे लग्न केले.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण :

  • प्राथमिक शिक्षण :
  • नोव्हेंबर १८९६ मध्ये आंबेडकरांच्या वडीलांनी आंबेडकरांना वयाच्या पाचव्या वर्षी सर्वप्रथम “कॅम्प स्कूल, सातारा” मध्ये प्रवेश घेतला.
  • पुढील प्राथमिक शिक्षणासाठी आंबेडकरांनी सातारा जिल्हयातील “अंग्रीकल्चर स्कुल” मध्ये प्रवेश केला.
  • माध्यमिक शिक्षण :
  • सयाजीराव गायकवाड यांनी आंबेडकरांना (Dr B R Ambedkar) केळुसकर या शिक्षकाच्या मदतीने २५ रुपयांची शिक्षवृत्ती सुरु केली. त्यातुनच आंबेडकरांनी एल्फिस्टन हायस्कूलमध्ये प्रवेश केला. १९०७ मध्ये मुंबई येथील “एल्फिस्टन हायस्कुल” मधुन आंबेडकर हे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. एल्फिस्टन हायस्कुलमध्ये प्रवेश घेणारे ते “पहीले अस्पृश्य विद्यार्थी” होते.
  • डॉ आंबेडकरांचे उच्च शिक्षण :
  • इंग्रजी व पर्शियन हे विषय घेवुन बाबासाहेब एल्फिस्टन कॉलेज मधुन १९१३ मध्ये बी. ए. उत्तीर्ण झाले.
  • १९१३ मध्ये बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने आंबेडकर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील “कोलंबिया” विद्यापीठ मध्ये राज्यशास्त्र विभागामध्ये प्रवेश केला.
  • १९१५ मध्ये “प्राचीन भारतातील व्यापार” (Trade In Ancient India) हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठामध्ये सादर केला आणि M.A. ची पदवी मिळवली.
  • १९१५ मध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये Ph.D. ची पदवी “द नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया ए हिस्टोरिकल अॅन्ड अॅनलिटीकल स्टडी” या प्रबंधाबद्दल १९१७ मध्ये आंबेडकरांना मिळाली.
  • १९१६ मध्ये आंबेडकरांनी (Dr B R Ambedkar) लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश घेतला. परंतु शिष्यवृत्तीची मुदत संपल्यामुळे त्यांना भारतात परत यावे लागले.
  • नोव्हेंबर १९१६ मध्ये जर्मनीतील “ग्रेज इन” विद्यापीठात बॅरिस्टरच्या अभ्यासक्रमासाठी आंबेडकरांनी प्रवेश घेतला व याच कॉलेज मधुन “बॅरिस्टर” ही पदवी मिळवली.
  • १९१७ मध्ये भारतात परत आल्यावर आंबेडकरांनी बडोदा संस्थान मध्ये “मिलिटरी सेक्रेटरी” या पदावर काहीकाळ नोकरी केली. परंतु तेथे काही कारणाने व आपल्याला अस्पृष्यतेच्या मिळत असलेल्या वागणुकीमुळे त्यांनी ती नोकरी सोडुन दिली.
  • आंबेडकर यांनी मुंबई येथे येवुन मुंबईमधील “वर्स कॉलेज” मध्ये अर्थशास्त्र, बैंकिंग व कायदा हे विषय काहीकाळ शिकवले.
  • १९१८ मध्ये मुंबई मधील “सिडनेहॅम कॉमर्स कॉलेज” मध्ये आंबेडकर हंगामी प्राध्यापक म्हणुन नियुक्ती स्वीकारली. या कॉलेजमध्ये आंबेडकर अर्थशास्त्र हा विषय शिकवित होते.
  • राजर्षी शाहू महाराजांनी आर्थिक साहाय्य केल्यामुळे सप्टेंबर १९२० मध्ये आंबेडकर पुढील शिक्षणाकरीता इंग्लंड करीता रवाना झाले.
  • १९२१ मध्ये इंग्लंड मधील लंडन विद्यापीठाची M.S.C. ही पदवी त्यांना प्राप्त झाली. याच काळामध्ये १९२२ साली “पॉब्लेम ऑफ रुपी” हा अर्थशास्त्रावरील महत्वपूर्ण ग्रंथ लिहला आणि याचं ग्रंथासाठी त्यांना लंडन विद्यापीठाने D.S.C. ही पदवी प्रदान केली.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ( Dr B R Ambedkar) सामाजिक कार्य :

१९२४ मध्ये आपले लंडनमधील शिक्षण आटोपल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर (Dr B R Ambedkar) भारतामध्ये परतले. भारतात परतल्यावर आंबेडकरांनी काही काळ मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकीली केली. परंतु वकिली करण्याबरोबरच आपले उर्वरित आयुष्य त्यांनी अस्पृश्यता निवारण हे आपले जिवीतकार्य मानून व्यतीत केले. याच सामाजिक कार्याचा आपण आढावा घेणार आहोत.

  • दरम्यानच्या काळामध्ये १९१९ साली ब्रिटीश शासनाने मताधिकाराची चौकशी करण्याकरीता नेमलेल्या “साऊथ ब्युरो कमिशन” समोर आंबेडकरांनी आपली साक्ष नोंदवली.
  • मुकनायक वृत्तपत्र :
  • राजर्षी शाहु महाराज यांच्या सहाय्यामुळे आंबेडकरांनी जानेवारी १९२० मध्ये “मुकनायक” हे पाक्षीक सुरु केले. मुकनायक या वृत्तपत्राचे प्रकाशक डॉ. आंबेडकर हे स्वतः होते तर संपादक पदाची जबाबदारी “देवराम विष्णु नाईक” यांच्याकडे होती व या पाक्षीकाच्या शिर्षक स्थानी “संत तुकाराम महाराजांची वचने” होती.
  • २० ते २१ मार्च १९२० या कालावधीत कोल्हापुर संस्थान मधील “माणगाव” येथे भरलेल्या अस्पृश्यांच्या परीषदेचे डॉ. बाबासाहेब (Dr B R Ambedkar) हे अध्यक्ष होते. याच परीषदेमध्येच आंबेडकरांनी आपले पहीले भाषण केले. या परीषदेचे प्रमुख पाहुणे असलेल्या राजर्षी शाहु महाराजांनी “डॉ. आंबेडकरांच्या रुपाने तुम्हाला मोठा दलित नेता मिळाला आहे” असे गौरव उद्गार काढले होते.
  • मुकनायक या वृत्तपत्राचे शिर्षक स्थानी संत तुकाराम महाराजांची वचने होती
  • बहिष्कृत हितकारणी सभा :
  • अस्पृश्य लोकांमध्ये नवजागृती करणे व त्यांची शैक्षणिक प्रगती करणे या उद्देशाने २० जुलै १९२४ रोजी आंबेडकरांनी “बहिष्कृत हितकारणी सभा” या संस्थेची स्थापना केली. या कालावधील डॉ. आंबेडकरांनी “बहिष्कृत मेळा” हे वृत्तपत्र सुरु केले. या सभेचे ब्रीदवाक्य “शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा” हे होते. १९ ते २० मार्च १९२७ या कालावधील रायगड जिल्हयातील “महाड” येथे बहिष्कृत हितकारणी सभेचे पहीले अधिवेशन डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते.
  • या संस्थेकडून ” सरस्वती विलास” नावाचे मासिक सुधा काढले जात असे.
  • १९२५ मध्ये आंबेडकरांनी गरीब दिन दलित अस्पृश्य मुलांसाठी “पहीले मोफत वस्तीगृह” काढले.
  • महाड सत्याग्रह :
  • महाड येथे झालेल्या पहिल्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० मार्च १९२७ रोजी आंबेडकरांनी त्यांच्या हजारो अनुयायांसह महाड येथील चवदार तळ्याचे पाणी पिऊन अस्पृश्यतेविरद्ध पहिला सत्याग्रह केला. हा सत्याग्रह म्हणजे आंबेडकरांचा (Dr B R Ambedkar) “अस्पृश्यतेविरुद्धचा पहिला लढा” म्हटल्या जातो. याच काळामध्ये आंबेडकरांनी “आंबेडकर सेवा दल” ची स्थापना केली. पुढे या संस्थेचे नाव “समता सैनिक दल” असे बदल करण्यात आले. महाडच्या सत्याग्रहानंतर ०३ एप्रील १९२७ रोजी डॉ.आंबेडकारांनी “बहिष्कृत भारत” हे पाक्षीक सुरु केले. या पाक्षीकाच्या शिर्षक स्थानी संत ज्ञानेश्वर यांची वचने होती. याच पाक्षीकातुन पुनश्च हरिओम हा प्रसिद्ध अग्रलेख डॉ.आंबेडकरांनी लिहीला होता.
  • सन १९२६ ते १९३६ दरम्यान डॉ. आंबेडकर हे ब्रिटीश शासनाच्या मुंबई कायदेमंडळाचे सदस्य होते.
  • समता संघ :
  • १९२७ मध्ये आंबेडकरांनी “समता संघ” ची स्थापना केली. समता संघामार्फत १९२८ मध्ये “समता” व १९३० मध्ये “जनता” ही वृत्तपत्रे सुरु केली. १९५६ मध्ये “जनता” या वृत्तपत्राचे नाव बदलून त्याचे नाव “प्रबुद्ध भारत” असे करण्यात आले होते.
  • भारतभुषण प्रिंटींग प्रेस :
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी “भारतभुषण प्रिंटींग प्रेस” या नावाने “मुद्रणालय” सुरु केले.
  • डॉ.आंबेडकर हे १९२७ मध्ये सोलापूर येथे झालेल्या जिल्हा वतनदार महार परीषद च्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष स्थान त्यांनी भूषविले होते.
  • मनुस्मृती दहन :
  • २५ डिसेंबर १९२७ रोजी रायगड मधील महाड येथे आंबेडकरांनी अस्पृश्यतेचा व विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या “मनुस्मृती” या हिंदु ग्रंथाचे “दहन” केले. या ग्रंथाचे दहन करण्यासाठी त्यांचे ब्राम्हण सहकारी गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे यांनी मोलाची मदत केली होती.
  • डॉ. आंबेडकरांनी (Dr B R Ambedkar) पुणे येथे २३ ऑक्टोंबर १९२८ रोजी “सायमन कमिशन” समोर अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणुन साक्ष दिली व वयात आलेल्या प्रत्येक स्त्री व पुरुषांना मताधिकार मिळावा अशी मागणी केली. तसेच १९३० मध्ये ब्रिटीश सरकारने नेमलेल्या स्टार्ट कमिटीवर सभासद म्हणुन आंबेडकरांची नेमणुक करण्यात आली होती.
  • डॉ पंजाबराव देशमुख यांच्या अमरावती येथील “अंबा माता देवी मंदिर” प्रवेश सत्याग्रहास डॉ.आंबेडकर यांनी पाठींबा दिला होता.
  • मंदिर प्रवेश सत्याग्रह :
  • एस. एम. जोशी यांच्या सहकार्याने हिंदू मंदिरांमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रवेश मिळावा यासाठी १९२९ मध्ये पुण्यातील “पर्वती” येथील मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणुन डॉ आंबेडकरांनी पहिला मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.
  • ०२ मार्च १९३० रोजी पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये नाशिक येथील “काळाराम मंदीर प्रवेश सत्याग्रह” केला. याचा परिणाम म्हणून पुढे १९३५ साली हे काळाराम मंदीर अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आले.
  • पुणे करार :
  • इंग्लंड येथे सन १९३० ते १९३२ दरम्यान भरविण्यात आलेल्या तीनही गोलमेज परीषदेस अस्पृश्यांचे प्रतिनीधी म्हणुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr B R Ambedkar) उपस्थित होते. या गोलमेज परिषदेमध्ये आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघांची आणि दलितांना ” प्रोटेस्ट ” चा दर्जा मिळावा अशी मागणी ब्रिटीश शासनाकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर रॅमसे मेकडॉनल्ड यांनी १९३२ मध्ये जाहीर केलेल्या जातीय निवाड्यामध्ये अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ ठेवण्यात आल्याचे जाहीर केले. ब्रिटीश शासनाचा अस्पृश्यांना हिंदु मधुन अलग करण्याचा ब्रिटीश सरकारचा डाव लक्षात आल्यामुळे २० सप्टेंबर १९३२ रोजी महात्मा गांधी यांनी पुणे येथील येरवडा जेल मध्ये प्राणंतिक उपोषण सुरु केले. २४ सप्टेबंर १९३२ रोजी गांधीजींचे प्राण वाचविण्याकरीता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीजीसह पुणे येथील येरवडा तुरुंगामध्ये महत्वपुर्ण करार केला. या करारान्वये दलितांना स्वतंत्र मतदार संघ देण्याऐवजी १४८ राखीव जागांचा संयुक्त मतदार संघ देण्याची अट आंबेडकरांनी मान्य केली. याच करारास “पुणे करार” किंवा “येरवडा करार” किंवा “ऐक्य करार” असे विविध नावांनी पुढे संबोधण्यात आले.
  • दलितांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधीजीनी खेळलेली चाल” असे वर्णन आंबेडकरांनी (Dr B R Ambedkar) पुणे कराराचे केले आहे.
  • १९३३ वर्षी हिंदू धार्मीक ग्रंथाच्या पारायणासठी “मुखेड” येथे सत्याग्रह केला.
  • स्वतंत्र मजुर पक्ष :
  • १९३५ च्या कायद्यान्वये होणाऱ्या निवडणुक लढविण्यासाठी १५ ऑगस्ट १९३६ रोजी आंबेडकरांनी “स्वतंत्र मजुर पक्ष” या पक्षाची स्थापना केली. या निवडणुकीमध्ये स्वतंत्र मजुर पक्षाचे १७ सदस्य निवडून आले होते.
  • २३ आक्टोबर १९३५ रोजी आंबेडकरांनी नाशिक जिल्ह्यातील “येवले” येथे भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परीषदेमध्ये “मी हिंद म्हणुन जन्माला आलो तरी हिंदु म्हणुन मरणार नाही” अशी महत्वपुर्ण घोषणा केली.
  • १९४१ मध्ये डॉ. आंबेडकरांच्या (Dr B R Ambedkar) प्रयत्नाने भारतीय लष्कारामध्ये “महार रेजिमेंट‘ ची स्थापना करण्यात आली.
  • ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्ष :
  • १९४२ मध्ये आप्पा दुराय यांच्या विनंती वरुन आंबेडकरांनी “ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशन” या पक्षाची स्थापना केली आणि या संघटनेचे अध्यक्ष म्हणुन एन. शिवराजन यांची नेमणुक केली. १९४२ यावर्षी झालेल्या निवडणुकीमध्ये या पक्षाने २२ पैकी १३ जागांवर विजय मिळविला.
  • १९४२ ते १९४६ दरम्यान व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये आंबेडकरांना “मजुर मंत्री” म्हणुन नियुक्त करण्यात आले होते.
  • पिपल्स एज्युकेशन सोसायटी :
  • १९४६ मध्ये आंबेडकरांनी मुंबई येथे “पिपल्स एज्युकेशन सोसायटी” ची स्थापना केली. याच संस्थेमार्फत मुंबई येथे “सिद्धार्थ कॉलेज” व १९४८ मध्ये औरंगाबाद येथे “मिलींद कॉलेज” स्थापन केले.
  • ०२ सप्टेंबर १९४६ रोजीच्या हंगामी मंत्री मंडळात आंबेडकारांना “कायदा मंत्री” म्हणून नेमण्यात आले.
  • घटनेचे शिल्पकार :
  • २९ ऑगस्ट १९४७ रोजी आंबेडकर यांना घटना समितीच्या “मसुदा समिती” चे अध्यक्ष बनविण्यात आले. मसुदा समिती मध्ये एन गोपालस्वामी, के.एम. मुन्शी, टि.टि.कृष्णामचारी व इतर असे एकुण ०७ (६-१-०७) सदस्य होते. घटना समितीचे घटना तयार करण्याचे कामकाज ०२ वर्ष ११ महीने १७ दिवस (१०८२ दिवस) चालले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना स्विकृत करण्यात आली व २६ जानेवरी १९५० रोजी घटनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली. आंबेडकरांच्या घटना तयार करण्याच्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना “ घटनेचे शिल्पकार” म्हणून ओळखले जाते.
  • हिदु कोड बिल :
  • १९४८ मध्ये आंबेडकरांनी हिदु कोड बिला मध्ये सुधारणा केली आणि ३९ पृष्ठांचे नवीन हिंदु कोड बिल सादर केले. स्त्रियांना व समाजातील सर्व घटकांना समान हक्क देणारे हिंदु कोड बिल सादर केल्यामुळेच आंबेडकरांना “आधुनिक मनु” म्हणुन ओळखले जाते. हिंदु कोड बिलातील विचारांमुळे आंबेडकरांना प्रचंड विरोधास सामोरे जावे लागले. याच प्रकरणामध्ये आंबेडकरांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला.
  • कामगार किंवा नोकरदार स्त्रीला प्रसूतीसाठी रजा मिळवून देणारे डॉ आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत.

डॉ आंबेडकर (Dr B R Ambedkar) यांचे विचार :

  • दुसऱ्या महायुद्धामध्ये राष्ट्रीय सभेने व भारतीयांनी ब्रिटीशांना सहकार्य करावे असे मत आंबेडकरांचे व्यक्त केले होते.
  • आंबेडकरांच्या मुखातुन बाहेर पडणारे शब्द म्हणजे पिस्तुलातुन उडणारे बार आहेत” असे आंबेडकरांबद्दल गौरव उद्गार “बेव्ही निकोल्सन” यांनी केले.
  • दलितांचा मुक्तीदाता” असा आंबेडकरांचा गौरव बडोदा संस्थानाचे सयाजीराव गायकवाड यांनी केला.
  • जर माझ्या मनात द्वेष भावना असती तर ०५ वर्षाच्या आत मी या देशाचे वाटोळे केले असते” असे उद्गार डॉ.आंबेडकरांनी काढले होते.
  • “अस्पृशता ही एक लोकांची लहर आहे”, “भिक्षेन गुलामगिरी मिळते स्वातंत्र नाही”“भाकरी पेक्षा इज्जत प्यारी” असे विचार डॉ. आंबेडकरांचे (Dr B R Ambedkar) होते.
  • “आंग्लाई व ब्राह्मणाई या हिंदु लोकांच्या अंगाला लागलेल्या दोन जळवा आहेत” असे आंबेडकर म्हणत.
  • “आंबेडकर व फुले हे एका अर्थाने द्वंद्व समास आहेत” असे उद्गार डॉ. भालचंद्र फडके यांनी काढले.
  • डॉ. आंबेडकर हे गौतम बुद्ध, संत कबीर व महात्मा फुले यांना गुरु मानत.

आंबेडकरांच्या मुखातुन बाहेर पडणारे शब्द म्हणजे पिस्तुलातुन उडणारे बार आहेत

बेव्ही निकोल्सन

दलितांचा मुक्तीदाता

सयाजीराव गायकवाड

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ :

क्रमांकग्रंथाचे नाव
1.रानडे, गांधी अॅन्ड जीना – १९४३
2.व्हॉट काँग्रेस अॅन्ड गांधी हॅव डन टु द अनटचेबलस् – १९४५
3.दि अनटचेबल्स – १९४६
4.थॉट्स ऑन पाकिस्तान – १९४८
5.द प्रॉब्लेम ऑफ रुपी
6.हु वेअर द शुद्राज
7.कास्ट इन इंडिया
8.बुद्ध अॅन्ड हिज धम्माज् (मरणोत्तर प्रकाशित-१९५७)
9.रिडल्स इन हिंदुजम
10.कास्ट इन इंडिया-प्रबंध
11.द राईज अॅन्ड फॉल ऑफ हिंदु वुमेन
12.हु आर दे अॅन्ड व्हाय दे विकेम अनटचेबल्स
13.अॅनिहिलेशन ऑफ कास्ट

डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मिळालेले पुरस्कार :

  • ०५ जानेवारी १९५२ रोजी अमेरीकेतील कोलंबिया विद्यापीठाने आंबेडकरांना (Dr B R Ambedkar) न्युयॉर्क येथे खास समारंभामध्ये L.L.D. ही पदवी बहाल केली.
  • १९५३ मध्ये हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने L.L.D. ही पदवी बहाल केली.
  • १४ एप्रील १९९० रोजी आंबेडकरांच्या जन्मशताब्दी दिनानिमीत्त भारत सरकारने त्यांना देशाचा सर्वोच्च बहुमान “भारतरत्न” ने सन्मानित केले.
  • १९९१ मध्ये डॉ आंबेडकर यांच्या स्मरणार्थ ”चवदार तळे सत्याग्रह” चित्र असलेले पोस्ट तिकीट प्रकाशित करण्यात आले.
  • २००७ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चेन्नई येथे “विधी विद्यापीठ” सुरु करण्यात आले आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर व महापरीनिर्वान :

  • १९३५ मध्ये धर्मातराबाबत घोषणा केल्यानंतर २१ वर्षे विवीध धर्माचा अभ्यास करुन गौतम बुद्धांच्या महानिर्वाणास २५०० वर्षे पुर्ण झाल्याबद्दल “विजयादशमी” च्या दिवशी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी आंबेडकरांनी महाराष्ट्रातील नागपुर येथे दिक्षा भुमीवर बौद्ध भिक्षु “चंद्रमणी महारथवीर” यांच्या बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. नागपुर हे दलितांचे पुर्वज नाग लोकांचे वस्तीस्थान असल्याने मुंबई येथे धर्मातर करण्याचा विचार रद्द करुन तो नागपुर येथे करण्याचा आंबेडकरांनी ठरविले होते.
  • ०६ डिसेंबर १९५६ रोजी आंबेडकरांचा मृत्यु दिल्ली येथे झाला. ०६ डिसेंबर हा दिवस देशात “महापरिनिर्वाण दिन” म्हणुन साजरा केला जातो. आंबेडकरांवर ०७ डिसेंबर १९५६ रोजी मुंबई मधील “दादर चौपाटी” येथे बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आला. तेथील त्यांचे समाधी स्थळास ”चैत्यभूमी” म्हणून ओळखले जाते.
  • आंबेडकरांच्या (Dr B R Ambedkar) जन्मशताब्दी निमीत्त १९९० मध्ये भारत शासनाने “भारतरत्न” हा सर्वोच्च सन्मान देवुन त्यांचा गोरव केला. १९९०-९१ हे वर्ष आंबेडकरांचे जन्मशताब्दी वर्ष हे “सामाजिक न्याय वर्ष” म्हणुन साजरे करण्यात आले.
नक्की वाचा : राजर्षी शाहू महाराज 

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here