राजर्षी शाहू महाराज | Shahu Maharaj

shahu maharaj
shahu maharaj

महराष्ट्रातील थोर समाजसुधारकांमध्ये राजर्षी शाहू महाराज | Shahu Maharaj यांचे स्थान हे मोलाचे आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी दिन-दलित आणि मागासवर्गीय समाजासाठी फार मोलाचे आणि भरीव कार्य केले आहे. त्यांचे महाराष्ट्राच्या आणि कोल्हापूर संस्थानच्या इतिहासातील स्थान हे अनन्यसाधारण आहे. अशा थोर समाजसुधारक आणि जाणत्या राज्याबद्दल आपण आज संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

पूर्ण नाव : छत्रपती शाहू महाराज भोसले

जन्म : २६ जुन १८७४ रोजी कोल्हापुर जिल्हयातील कागल या गावी घाटगे घराण्यात “लक्ष्मी विलास पॅलेस” मध्ये झाला. २६ जुन हा शाहु महाराजांचा (Shahu Maharaj) जन्म दिवस महाराष्ट्र शासनाने सन २००६ पासुन “सामाजिक न्याय दिन” महाराष्ट्रभर म्हणुन साजरा करण्याचे ठरविले आहे.

मुळ नाव : यशवंत (यशवंत जससिंगराव घाटगे) होते. शाहु महाराज यांच्या वडीलांचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब होते. तर त्यांच्या आईचे नाव “राधाबाई” असे होते.

दत्तकविधान : कोल्हापुर संस्थानच्या तत्कालीन महाराणी आनंदीबाई साहेब यांनी शाहु महाराज यांना १७ मार्च १८८४ रोजी दत्तक घेतले. शाहू महाराजांच्या दत्तक विधानाच्या वेळी ब्रिटीश सरकार तर्फे मुंबईचा गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन व कर्नल एच.ए.रिव्हज यांनी शाहु महाराजांच्या (Shahu Maharaj) दत्तक विधानास आपली मान्यता दिली होती.

विवाह व मुल : १ एप्रील १८९१ रोजी बडोदा येथील गुणाजी खानविलकर यांची कन्या “लक्ष्मीबाई” यांच्याशी शाहु महाराज यांचा विवाह झाला. महाराजांना राधाबाई व आऊबाई अशा दोन मुली होत्या आणि राजाराम व शिवाजी अशी दोन मुले अशी एकुण ०४ आपत्ये होती. त्यापैकी धाकटा मुलगा राजकुमार शिवाजी यांचा १९२० साली रानडुकराच्या शिकारीच्या वेळी घोड्याहुन पडुन मृत्यु झाला होता.

राज्याभिषेक : ०२ एप्रील १८९४ रोजी शाहु महाराजांचा (Shahu Maharaj) “राज्याभिषेक” होवुन वयाच्या २० व्या वर्षी कोल्हापूर संस्थानाची सुत्रे शाहू महाराजांनी आपल्या हातात स्विकारली. शाहू महाराजांच्या राज्याभिषेक साहेळ्या दरम्यान कोल्हापूर संस्थांनमध्ये ब्रिटीश सरकारचा प्रतिनिधी म्हणून तत्कालीन मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड हॅरिसन हा स्वतः उपस्थित होता.

शाहू महाराजांचे शिक्षण :

  • प्राथमिक शिक्षण : प्राथमिक शिक्षक म्हणुन श्री कृष्णाजी भिकाजी गोखले व हरिपंत गोखले यांची नेमणूक केली होती.
  • महाविद्यालयीण शिक्षण : १८८५ ते १८८९ या काळात शाहुमहारांनी राजपुत्रांच्यासाठी असलेल्या “राजकोट” महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यांना या महाविद्यालयाचे प्रिन्सीपॉल मॅकनॉटन यांनी विशेष मार्गदर्शन केले. १८९० ते १८९४ या काळात शाहू महाराजांनी (Shahu Maharaj) इंग्रजी भाषा, जगाचा इतिहास व राज्य कारभाराचे धडे “धारवाड” येथील “एस.एम.फ्रेजर” यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले.
  • मल्लविद्या : दत्ताजी शिंदे व पांडुरंग भोसले यांच्या कडून मल्लविद्येचे शिक्षण शाहू महाराजांना मिळाले.
  • २० मार्च १८८६ रोजी शाहु महाराज यांचे वडील जयसिंगराव यांचा मृत्यु झाला.

वेदोक्त प्रकरण :

  • नोव्हेंबर १८९९ मध्ये महाराजांच्या जिवनास कलाटणी देणारे “वेदोक्त प्रकरण” घड़ले. शाहू महाराज पंचगंगा नदी काठी स्थानासाठी गेले असताना त्यांचे पुरोहित नारायण भटजी हे वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे महाराजांचे सहकारी राजाराम शास्त्री भागवत यांनी महाराजांना लक्षात आणुन दिले. या बाबत महाराजांनी पुरोहितांना विचारणा केली असता महाराज हे क्षेत्रीय नसल्यामुळे त्यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार नसल्याचे त्यांच्या पुरोहिताने सांगतीले व यावरून नंतर वाद निर्माण झाला होता.
  • १९०१ मध्ये शाहु महाराजांनी (Shahu Maharaj) आप्पासाहेब राजोपाध्याय यांचे वतने जप्त केली व नारायण भट्ट सेवकरी यांच्या कडुन वेदोक्त पद्धतीने श्रवणी केली.
  • या वेदोक्त प्रकरणामध्ये लोकमान्य टिळक व शृंगरीचे जगद्तगुरु शंकराचार्य यांनी ब्राम्हणांची घेतली होती आणि उलटपक्षी टीका महाराजांवर केली होती. याचाच परिणाम म्हणून महराजांनी ब्राम्हणेतर चळवळीला सुरुवात केली होती.
  • १९०५ साली शाहु महाराजांनी (Shahu Maharaj) राजोपाध्याय यांची इनामे जप्त केली व छात्र जगद्तगुरुचे नवे पीठ निर्माण करुन मराठा जातीच्या “सदाशिव बेनाडीकर” यांची पीठाचे प्रमुख म्हणुन नेमणुक करण्यात आली.

स्थापना व बांधकाम :

  • १८९५ मध्ये कोल्हापूर येथे “शाहुपूरी” ही गुळाची बाजारपेठ केली.
  • १८९७ साली महारोग्यांसाठी “व्हिक्टोरीया लेप्रसी” या हॉस्पीटलची स्थापना शाह महाराजांनी केली.
  • १९०६ मध्ये “छत्रपती शाहु स्पिनींग व जिनींग मिल” स्थापन केली.
  • १९०७ साली कोल्हापुरच्या पश्चिमेस ५५ किमी अंतरावर दाजीपुर जवळ भोगावती नदीवर धरण बांधुन त्याच्या जलाशयास “महाराणी लक्ष्मीबाई” हे नाव देण्यात आले. याच धरणाजवळच्या रानामध्ये शाहु महाराजांच्या राधाबाई या मुलीच्या नावावर “राधानगरी” हे गाव वसविण्यात आले.
  • ११ जानेवारी १९११ रोजी शाहू महाराजांनी (Shahu Maharaj) कोल्हापूर येथे “सत्यशोधक समाज” या संस्थेच्या शाखेची स्थापना केली व त्यांचे अनुयायी भास्करराव जाधव यांची अध्यक्ष म्हणुन नेमणुक केली होती.
  • १९१३ मध्ये नागरी पतपेढ्यांची स्थापना केली.
  • १९१८ साली शाहु महाराजांनी कोल्हापूरमध्ये “आर्य समाज” या संस्थेच्या शाखेची स्थापना करुन राजाराम महाविद्यालय हे आर्य समाजाकडे हस्तांतरीत करण्यात आले.
  • शाहु महाराजांनी कोल्हापर येथे देशातील पहीले “रेसकोर्स” स्थापन केले.
  • छत्रपती शाहु महाराजांनी गंगाधर कांबळे या अस्पृश्य समाजाच्या व्यक्तीस चहाचे हॉटेल टाकुन दिले व त्या हॉटेलला “सत्यशोधक हॉटेल” असे नाव दिले.
  • ब्रिटीशांच्या विरोधात शिवाजी क्लब ही क्रांतीकारी संघटना कोल्हापूर येथे स्थापन करण्यात आली होती.
  • शाहु महाराजांनी (Shahu Maharaj) कुस्त्यांकरीता कोल्हापूर संस्थांनमध्ये “खासबाग मैदान” तयार केले.
  • १८९३ मध्ये “देवल क्लब” ची स्थापना केली.
  • १८९५ मध्ये “मोतीबाग तालीम” ची स्थापना केली.
  • १९१३ मध्ये धो. रा. सुतार यांनी तयार केलेला शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा पन्हाळा गडावर स्थापन केला होता.
  • शाहु महाराजांनी मुलांमध्ये लष्करी जीवनाची आवड निर्माण व्हावी म्हणुन कोल्हापूर येथे “इन्फंट्री स्कुल” ची स्थापना केली.
  • १९०५ मध्ये १५ लाख रुपयांची भांडवीली गुंतवणुक करुन सुत गिरणी स्थापन केली.
  • १८९५ मध्ये शाहु महाराजांनी कोल्हापूर संस्थान मधील शेणगावं येथे काताचा कारखाना सुरु करण्यात आला.

शाहू महाराजांनी सुरु केलेल्या शाळा व वसतिगृह :

  • १८९६ साली सर्व जाती जमातींच्या विद्यार्थांसाठी शाहू महाराजांनी “राजाराम” हे वस्तीगृह सुरु केले.
  • १९०१ साली शाहु महाराजांनी “व्हिक्टोरीया मराठा बोर्डींग” ची स्थापना केली.
  • १८ एप्रील १९०१ रोजी जैन, लिंगायत व मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र्य वस्तीगृहे शाहु महाराजांनी स्थापन केली.
  • संस्थान मध्ये निरनिराळ्या जातींचे पुरोहीत निर्माण करण्याकरीता “पुरोहीत शाळा” निर्माण केल्या.
  • १९०६ साली कोल्हापूर संस्थानात मुलांसाठी “रात्रशाळा” सुरु केल्या.
  • १९०७ साली शाहू महाराजांनी (Shahu Maharaj) मुलींसाठी रात्रशाळा सुरु केल्या.
  • १९०८ साली अस्पृश्यांसाठी “मिस क्लार्क” हे वस्तीगृह स्थापन केले.
  • १९११ साली शिंपी समाजाच्या मुलांसाठी “नामदेव वस्तीगृह” सुरु केले
  • १९१२-१३ साली महाराजांनी संस्थान मधील शेतकऱ्यांना शेती विषयक शिक्षण देण्याकरीता “किंग एडवर्ड अँग्रीकल्चर इन्स्टिट्युट” या संस्थेची स्थापना केली.
  • १९१२ मध्ये महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये ”पाटील शाळा” सुरु केल्या
  • १९१३ मध्ये कोल्हापूर संस्थानमध्ये सत्यशोधक समाजाच्या शाळा सुरु करुन त्याच्या प्रमुखपदी/ अध्यक्षपदी विठ्ठलराव ढोणे यांची नेमणुक करण्यात आली.
  • १९१६ मध्ये बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, बहुजनांना राजकीय हक्क मिळवुन देणे या कार्यासाठी निपाणी येथे “डेक्कन रयत शिक्षण संस्था” ची स्थापना केली.
  • २१ नोव्हेबर १९१७ रोजी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. यासंबधाने पहीलीशाळा “चिपरीपेटा” येथे शाहू महाराजांनी सुरु केली.
  • १९१८ मध्ये कोल्हापूर संस्थान मध्ये “तलाठी शाळा” सुरु केल्या.
  • १९२० साली शाहु महाराजांनी (Shahu Maharaj) कोल्हापूर येथे “लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कुल” ची स्थापना केली.
  • १९२० मध्ये कोल्हापूर संस्थांमधील गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणुन कोल्हापूर येथे “प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस” ची स्थापना केली.
  • ०४ मार्च १९१८ रोजी करवीर तालुक्यातील चिखली या गावा सक्तीचे व मोफत शिक्षण देणारी शाळा शाहू महाराजांनी सुरु केली.

वसतिगृहे व स्थापना वर्ष

१. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस (१९०१) २. दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१) 
३. वीरशैव लिंगायत विद्यार्थी वसतिगृह (१९०६) ४. मुस्लीम बोर्डिंग (१९०६)
५. मिस क्लार्क होस्टेल (१९०८)६. दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग (१९०८)
७. श्री नामदेव बोर्डिंग (१९०८)८. पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (१९१२)
९. श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५)१०. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५)
११. कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह (१९१५)१२. आर्यसमाज गुरूकुल (१९१८)
१३. वैश्य बोर्डिंग (१९१८)१४. ढोर चांभार बोर्डिंग (१९१९)
१५. शिवाजी वैदिक विद्यालय वसतिरगृह (१९२०)१६. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस (१९२०)
१७. इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९२१)१८. नाभिक विद्यार्थी वसतिगृह (१९२१)
१९. सोमवंशीय आर्यक्षत्रिय बोर्डिंग (१९२०)२०. श्री देवांग बोर्डिंग (१९२०)
२१. उदाजी मराठा वसतिगृह, नाशिक (१९२०)२२. चौथे शिवाजी महाराज मराठा वसतिगृह, अहमदनगर (१९२०)
२३. वंजारी समाज वसतिगृह, नाशिक (१९२०)२४. श्री शाहू छत्रपती बोर्डिंग, नाशिक (१९१९)
२५. चोखामेळा वसतिगृह, नागपूर (१९२०)२६. छत्रपती ताराबाई मराठा बोर्डिंग, पुणे (१९२०)

शाहू महाराजांचे सामाजिक कार्य :

  • १९०१ सालामध्ये शाहु महाराजांनी कोल्हापुर संस्थानामध्ये “गोहत्या प्रतीबंधक कायदा” लागु केला.
  • २६ जुलै १९०२ रोजी शाहु महाराजांनी कोल्हापुर संस्थानातील मागासवर्गीय लोकांसाठी संस्थांमध्ये नोकऱ्यांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या. आरक्षण बाबतचा हा जाहीरनामा “करवीर गॅजेट” मधुन प्रकाशित करण्यात आला होता.
  • १९०२ साली शाहु महाराजांनी (Shahu Maharaj) “पाटबंधारे धोरण” घोषीत केले.
  • २० मे १९११ रोजी शाहु महाराजांनी संस्थानामार्फत जाहीरनामा प्रसिद्ध करुन संस्थानातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना १५ टक्के शिष्यवृत्तीची घोषणा केली.
  • १९११ च्या हुकूमनाम्यानुसार अस्पृश्यांना मोफत शिक्षण देण्यास सुरुवात केली.
  • १९१२ साली शाहु महाराजांनी कोल्हापूर संस्थानमध्ये “सहकारी कायदा” पारीत केला होता.
  • १९१७ साली विधवा पुर्नविवाहास मान्यता देणारा कायदा शाहु महाराजांनी पारीत केला.
  • २५ जुलै १९१७ रोजी प्राथमिक शाळेमध्ये फी माफीची घोषणा शाहू महाराजांनी केली.
  • १९१७ साली जातवार प्रतीनिधीत्वासाठी शाहू महाराजांनी भारत मंत्री लार्ड मान्टेग्यू यांची भेट घेतली होती.
  • शाहु महाराजांनी (Shahu Maharaj) १९१९ च्या माँटेग्यु-चेम्सफर्ड या कायद्याचे स्वागत केले होते.
  • १९१८ साली महाराजांनी महार वतने आणि बलुतेदारी व वेठबिगारी प्रथा बंद केली. त्याचबरोबर आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा संमत केला.
  • १९२० मध्ये शाहु महाराजांनी संस्थानामध्ये “घटस्फोटाचा कायदा” संमत केला.
  • शाहु महाराजांनी महार पैलवानांना जाट पैलवान, चांभारांना सरदार व भंग्यांना पंडीत अशा पदव्या दिल्या होत्या. महाराजांनी कोल्हापूर नगर पालिकेच्या चेरमनपदी “दत्तोबा पवार” या अस्पृश्य समाजाच्या व्यक्तीची नेमणूक केली होती.

शाहू महाराजांची महत्वाची कार्ये :

  • डॉ आंबेडकर यांच्या “मुकनायक” व आगरकर यांच्या “सुधारक” या वृतपत्रांना शाहु महाराजांनी आर्थीक सहकार्य केले होते.
  • शाहु महाराजांनी पं. म. मोहन मालविय यांच्या विनंतीवरुन “बनारस हिंदु विश्व विद्यालयास” आर्थिक सहकार्य केले.
  • थिऑसॉफिकल सोसायटी” या धार्मीक संघटनेचा शाहु महाराजांवर विशेष प्रभाव होतो.
  • क्रांतीकारकांनी काढलेल्या “वनिता वस्त्रभंडार” येथुन शाहु महाराज हे दरवर्षी संस्थानाचे कपडे खरेदी करत असत.
  • महाराजांनी “इंडियन अनरेस्ट‘ या ग्रंथाचे मराठीमध्ये अनुवाद रा. र. डॉगरे यांचे कडुन करुन घेवुन त्या ग्रंथाच्या प्रती कोल्हापूर संस्थानमध्ये मोफत वाटल्या होत्या.
  • शाहु महाराजांनी (Shahu Maharaj) कोल्हापूर संस्थानच्या शिक्षणाधिकारी पदी मिस लिट्स नंरत श्रीमंत रखमाबाई केळकर यांची नेमणुक केली.
  • १९१२ मध्ये पैलवानांना कुस्ती जिंकल्यानंतर गदा देण्याच्या प्रथेची सुरुवात शाहु महाराजांनी केली इमाम बक्श पहिलवानास शाहू महाराजांनी पहीली गदा दिली होती.
  • १८९१ मध्ये शाहु महाराजांनी संस्थानाचे “भु-गर्भशास्त्र सर्वेक्षण” केले. आणि १८९५ मध्ये शाहू महाराजांनी संस्थानाचे “औद्योगीक सर्वेक्षण” केले होते.
  • १९०६ ते १९०७ मध्ये शाहु महाराजांनी संस्थानाचे “जल सर्वेक्षण” केले होते.
  • शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानमध्ये तांत्रीक शिक्षणाकरीता जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्ट्युट या संस्थेची स्थापना केली.
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्लंड मधील शिक्षण घेण्याकरीता शाहु महाराजांनी शिष्यवृत्ती देवुन आर्थिक सहाय्य केले होते.

शाहू महाराजांनी भूषवलेली अध्यक्षपदे :

  • १० नोव्हेंबर १९१८ रोजी परळ (मुंबई) येथे झालेल्या कामगारांच्या सभेचे अध्यक्षस्थान शाहु महाराजांनी भुषविले.
  • १९१८ साली शाहु महाराजांनी (Shahu Maharaj) नवसारी (गुजरात) येथे भरलेल्या “आर्य समाज” च्या ११ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष पद भुषविले होते.
  • १९ एप्रील १९१९ रोजी शाहु महाराजांनी कानपुर येथे भरलेल्या कुर्मी क्षत्रीय परीषदेच्या १३ व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भुषविले होते. याच कार्यक्रमात शाहु महाराजांना राजर्षी ही पदवी बहाल रण्यात आली होती.
  • १९२० मध्ये शाहु महाराजांनी नागपूर व दिल्ली येथील अखिल भारतीय बहीष्कृत परीषदेचे अध्यक्षपद भूषविले.
  • २० मार्च १९२० रोजी शाहु महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील माणगांव येथील दलीतांच्या परीषदेसत उपस्थित राहुन डॉ आंबेडकर यांनी दलीत समाजाचे नेतृत्व करण्याबद्दल प्रोत्साहन दिले.
  • १९२० साली कर्नाटक मधील हुबळी येथे ब्राम्हणेत्तर परीषद भरविण्यात आली होती या परीषदेचे शाहु महाराज अध्यक्ष होते.

शाहू महाराजांचे सन्मान व पदव्या :

  • ब्रिटन राणी व्हिक्टोरीयाच्या वतीने शाहू महाराजांना (Shahu Maharaj) GCSI हा इंग्रज शासनाचा बहुमान लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या हस्ते देण्यात आला होता.
  • १९०० मध्ये व्हिक्टोरीया राणीच्या वाढदिवसानिमीत्ताने ब्रिटीश सरकारने शाहू महाराजांना “महाराजा” ही पदवी दिली.
  • एप्रील १९२० रोजी शाहू महाराजांना नाशिकच्या जनतेकडुन मानपत्रे अर्पण करण्यात आली.
  • शाहु महाराज म्हणजे सर्वांगपुर्ण राष्ट्रपुरुष” असा गौरव महर्षी वि रा शिंदे यांनी केला.
  • He was king, But democratic king” अशा शब्दात भाई माधवराव बागल यांनी केले.
  • महाराष्ट्राचा गौतमबुद्ध” असे वर्णन यशवंतराव मोहीले यांनी केले.
  • He was a pioneer of Social Democracy” असे शाहू महाराजांबद्दल वर्णन डॉ. आंबेडकर यांनी केले आहे.
  • ०२ जुन १९०२ रोजी शाहू महाराज हे इंग्लंडच्या ०७ व्या एडवर्ड च्या राज्यरोहन संमारंभासाठी इंग्लंडला गेले होते. या कार्यक्रमाचे वेळी के बीज विद्यापीठाने शाहू महाराजांना LLD ही पदवी बहाल केली.
  • शाहू महाराजांच्या (Shahu Maharaj) सन्मानार्थ कोल्हापूर येथील रेल्वे स्थानकास “छत्रपती शाहु टर्मिनस” हे नाव देण्यात आले आहे.

शाहू महाराज | Shahu Maharaj यांचा मृत्यू :

  • ०६ मे १९२२ रोजी मुंबई येथील खेतवाडी मधील “पन्हाळा लॉज” या बंगल्यावर वयाच्या ४८ व्या वर्षी शाहू महाराजांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यु झाला.

नक्की वाचा : मराठी व्याकरण

नक्की वाचा : इतिहास प्रश्नसंच

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here